लातुर : देशाच्या व राज्याच्या इतिहासात कधीही पक्षामध्ये इतकी फोडाफोडी झाली नाही जी भाजपाने केली आहे. प्रथम शिवसेना नंतर राष्ट्रवादी पक्ष भाजपाने फोडला. सगळ्या घोटाळेबाजांना मोदींनी आपल्या परिवारात सामावून घेतले. भाजप आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो, नाशिक पुण्यात अमली पदार्थाचे साठे सापडत आहे, शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही, पिकांना बाजारभाव नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता आपल्याला बदल करावा लागेल. त्यामुळे लातुरमधून शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी विजय करा. असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. लातुर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी थोरात बोलत होते.
हेही वाचा…नाशिकमधून भुजबळांची माघार, ना गोडसे, ना दिनकर पाटील, भाजपच्या ‘या’ नेत्याची चर्चा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, लातूर म्हटले की, स्व. विलासराव देशमुख व चाकूरकर साहेब यांची आठवण येतेच. मी प्रथम मंत्रिमंडळात असताना स्वर्गीय विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचे काम विलासरावांनी केले. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची वाटचाल महाराष्ट्राने पाहिली आहे. अमित देशमुख त्यांचा हाच वारसा पुढे घेऊन जात असून आता पुन्हा काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. भारतीय जनता पार्टी आणि मोदींविरोधात जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे.
हेही वाचा…सुनेत्रा पवार अन् सुनील तटकरेंनी सादर केला उमेदवारी अर्ज, अजित पवारांनीही भरला डमी फॉर्म
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकण्याचे काम करत असून मणिपूरच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. झारखंड व दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले असून या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतून त्यांना बाहेर करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांवर ईडीची छापेमारी सुरू आहे. राज्यघटनेमुळे आपल्याला सन्मान मिळाला, समानता मिळाली आणि तीच राज्यघटना आता धोक्यात आली आहे. आपल्या सर्वांना मिळून आता राज्यघटना व लोकशाही वाचवायची आहे. असेही ते म्हणाले.
तरुण बेरोजगार आहे, मागील वीस वर्षात कोणतीही ठोस भरती झाली नाही, महागाईवर पंतप्रधान मोदी बोलण्यास तयार नाही, धर्माच्या नावावर द्वेष निर्माण करून मतांची पोळी भाजण्याचे काम भाजपा व त्यांचे मित्र पक्ष करत आहे. 7 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्वांनी कटिबद्ध राहून प्रचंड मताधिक्यांनी लातूरचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांना विजयी करा. असे आवाहनही त्यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“अर्चना पाटील या देखील घरातलीच सुन”, धाराशिवच्या सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना टोला
हेही वाचा…“ही निवडणुक गावकी-भावकीची नाही, तर…” आढळरावांनी काढला कोल्हेंचा चिमटा