पुणे : काल महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, बारामतीमधून सुप्रिया सुळे तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला.सत्तेचा उन्माद काय असतो ह राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवरही चांगलीच टिका केली. तर राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही ? असा सवाल देखील पवारांनी केलाय. त्यावर आता भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पलटवार केलाय.
हेही वाचा…सुनेत्रा पवार अन् सुनील तटकरेंनी सादर केला उमेदवारी अर्ज, अजित पवारांनीही भरला डमी फॉर्म
अयोध्या येथील मंदिरात बाल रामचंद्राची मूर्ती आहे. याची माहिती न घेताच प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही याची चौकशी नास्तिक म्हणवणार्या पवार साहेबांनी करू नये. त्यांनी आपल्या शेताच्या बांधातच बोलावे, देव, धर्म, देऊळ या त्यांच्या प्रांतात नसलेल्या बांधात घुसखोरी करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शुक्रवारी लगावला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही, असा सवाल अलिकडेच उपस्थित केला आहे. त्यासंर्दभात भांडारी बोलत होते.
हेही वाचा…आढळराव पाटलांना खासदार करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
भांडारी म्हणाले की, पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे विधान करण्यापूर्वी प्राथमिक माहिती घेतली असती तरी बरे झाले असते. कुटुंबातील
सुनेला बाहेरची म्हणून आपला स्त्री शक्तीबद्दलचा खरा दृष्टिकोन दाखवणार्या साहेबांनी ऊसाचा उतारा, द्राक्षाची छाटणी, डाळींब लागवड यासारख्या त्यांच्या अभ्यासाच्या विषयांवर हवे तितके बोलावे. मात्र देव-धर्म, संस्कृती विषय त्यांच्या “सातबाऱ्या’ वर कधीच दिसला नाही. अभ्यास नसलेल्या अशा विषयांबद्दल बोलून पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या ‘मती’चे दिव्यदर्शन घडवू नये.
आदरणीय पवार साहेबांच्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाबद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यांनी आपल्या संबंधित क्षेत्राबाबत मत प्रदर्शन केले तर कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र ते स्वत:ला नास्तिक म्हणवतात. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही, याची काळजी त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पवार साहेबांना बोलण्यासाठी विषय हवा असला तर बारामती तालुक्यातील जिरायती भागाला का पाणी मिळू शकले नाही, यासारखा चांगला विषय नाही. सध्या ते बारामतीतच अडकून पडल्याने त्यांना आपल्या तालुक्यातील जिरायती भागाला का पाणी मिळू शकले नाही, याबाबतचा शोध निबंध तयार करता येईल.
READ ALSO :
हेही वाचा…“अर्चना पाटील या देखील घरातलीच सुन”, धाराशिवच्या सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना टोला
हेही वाचा…“ही निवडणुक गावकी-भावकीची नाही, तर…” आढळरावांनी काढला कोल्हेंचा चिमटा
हेही वाचा…नाशिकमधून भुजबळांची माघार, ना गोडसे, ना दिनकर पाटील, भाजपच्या ‘या’ नेत्याची चर्चा