मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गुरूवारी मोठा राडा झाला. शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आल्याने आता त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहे. स्मृतीस्थळावर शिंदे गटाचे कार्यकर्ते दोन तास का थांबले ? असा सवाल केला जात आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटावर जोरदार टिका केली आहे. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“ओबीसींचा स्वत:चा पक्ष काढा, अन् आपली ताकद दाखवून द्या,” एल्गार मेळाव्यात भुजबळांकडे कोणी केली मागणी?
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला कुठलाही वाद विवाद, संघर्ष लागू नये म्हणून स्वत: आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत कालच स्मृतिस्थळावर गेलो, दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेते त्याठिकाणी येऊन बाळासाहेबांच्या पुण्यस्मृतींना गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांना तिथे येण्याची गरज नव्हती. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला पुण्यात अजित पवार गटाचा विरोध, पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवार गट
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून दर्शनासाठी गेलो असतो. परंतु वाद नको म्हणून गेलो नाही. काल घडलेल्या घटनेचं निषेध केलं असून सर्वांना शांतेतचं आवाहनही केलं आहे. बाळासाहेबांच्या विचार बाजूला सारून त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची फटकावली. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालललो आहे. त्यांच्या विचारांप्रमाणे, भूमिकेप्रमाणे आम्ही सरकार घेऊन चालवत आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“भुजबळांचं वय झालंय, पण आपला दर्जा घसरू देणार नाही,” जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार”, आरक्षणासाठी वडेट्टीवारांनी घेतला प्रण
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“न्याय मिळाला नाही तर पिवळ्या झेंड्याला सलाम करून..,” विजय वडेट्टीवारांनी दिला कडक इशारा