सांगली : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. मराठा समाजाचे पुरावे उपलब्ध होत आहे. त्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली. छगन भुजबळांचे वय झाले आहे. त्यामुळेच ते अशी खालच्या पातळीची वक्तव्य करत आहेत. पण मराठा समाज आपला दर्जा घसरू देणार नाही. त्यांना मराठे महत्व देणार नाहीत. असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला पुण्यात अजित पवार गटाचा विरोध, पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवार गट
जालन्यातीन एल्गार सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. यावरून आता मनोज जरांगे पाटलांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय. मराठे त्यांना महत्व देणार नाहीत. दंगली घडवण्याची भाषा करू नये. आम्हाला वातावरण खराब करायचे नाही, आमच्या शेपटावर पाय देऊ नका, नाही तर मराठा काय करू शकतो हे दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा…अजित पवार गटाचे ‘९’ शिलेदार निवडणुकीसाठी तयार, लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर ?
दरम्यान, उपोषण केले, पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तो लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला. फक्त ७० पोलीस कर्मचारी होते. तिथे तेव्हा दगडाचा मारा सुरू झाला. ७० पोलिस काय पाय घसरून पडले का ? महिला आयोगाने त्या महिला पोलिसांना विचारा. शिवाजी महाराजांनी मोघलांच्या सुनेला परत पाठवले पण यांनी काय केले तर महिला पोलिसांवर दगडफेक केली. असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार”, आरक्षणासाठी वडेट्टीवारांनी घेतला प्रण
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“तुझ्यासारखं सासऱ्याच्या जीवावर तुकडे मोडत नाही”, भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल
हेही वाचा…“न्याय मिळाला नाही तर पिवळ्या झेंड्याला सलाम करून..,” विजय वडेट्टीवारांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“ओबीसींचा स्वत:चा पक्ष काढा, अन् आपली ताकद दाखवून द्या,” एल्गार मेळाव्यात भुजबळांकडे कोणी केली मागणी?