मुंबई : काल राज्यात अनेक शहरात मोठा राडा झाला. त्रिपुरामध्ये जमावाने मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ काल विविध ठिकाणी मुस्लिम मोर्चे काढले गेले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते.
एसटी आंदोलनात आता अण्णा हजारेंची उडी; पाठींबा देत म्हणाले, सरकार पडू शकतं असं वाटल्याशिवाय…
अमरावतीमध्ये या जमावाने अनेक दुकाने फोडली, दुचाकी तोडल्या. पोलीसांवर दगडफेक केली. बघता बघता महाराष्ट्राच्या काही शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. भिवंडी-नांदेडमध्ये रजा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याचा आरोप आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
त्रिपुरातील घटनेची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही; हिंसक आंदोलनावरून प्रविण दरेकर आक्रमक
या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशारा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावेळी नांदेडमध्ये मुस्लिम मोर्चा हिंसक झाला. एसपी प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले, नांदेडमध्ये रजा अकादमीने प्रोटेस्टचे आयोजन केले होते. त्यातले काही तरुण मिक्स लोकसंख्या असलेल्या रहिवाशी भागात जायला निघाले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
अमरावतीत 144 कलम लागू; आंदोलकांनी टपरी जाळली, दंगानियंत्रक पथके तैनात
पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर मग पोलीसांनी त्यांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या. आज देखील काही ठिकाणी किरकोळ घटना घडत आहेत. यामुळे राणे यांनी ट्विट करत हा इशारा दिला आहे. नितेश राणे हे सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. कालच एसटी कामगारांच्या संपावरुनही परिवहन मंत्री परबांना चांगलेच खडसावले होते. त्यानंतर त्यांच्या टार्गेटवर आता रजा अकादमी असल्याचे दिसून आले.
Read Also :
- जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले
- अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया
- पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको – सुजय विखे पाटील
- मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील
- त्रिपुरात असं काही घडलंच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावतीतील हिंसाचारावर फडणवीसांचा संताप