अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या राज्यात आपण सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहोत. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांना हे पाहवत नाही. त्यामुळे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल काय चर्चा झाली?
यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद उमटून मालेगाव, नांदेड, अमरावती येथे जे प्रकार सुरू आहेत, ते समाजकंटक आणि विध्वंसक वृत्तीच्या लोकांनी घडवून आणले आहेत. ज्यांना चांगले चालले बघवत नाही, असे लोक हे प्रकार करतात. मात्र, याचा फटका सामान्यांना बसतो. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. यासाठी तरुणांचा वापर केला जातो. त्यामुळे तरुणांनी अशा गोष्टींना बळी पडता कामा नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीतही हेच सुरू आहे. एसटीला साठ वर्षे होऊन गेली आहेत.
एसटी आंदोलनात आता अण्णा हजारेंची उडी; पाठींबा देत म्हणाले, सरकार पडू शकतं असं वाटल्याशिवाय…
आम्हालाही वाटते की कर्मचाऱ्यांचे भले व्हावे. जे शक्य आहे, ते आम्ही करीत आलो आहोत. तीही आपलीच माणसे आहेत. शिवाय प्रवाशांचाही विचार करावा लागणार आहे. असे असताना त्यांना आंदोलनासाठी भडकावले जात आहे. आता त्यांनीच विचार करावा की त्यांचे हित कशात आहे. आम्ही तर जे शक्य आहे, ते करणारच आहोत. सध्या काहींचे फसवे राजकारण सुरू आहे. लोकांना त्रास होईल, या पद्धतीने राजकारण केले जात आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या राज्यात घडत आहेत. त्यामुळे राज्यातील सुज्ञ जनतेने आता यावर विचार केला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार जातपात, धर्म, नातीगोती यांचा विचार करीत नाही. सर्वांचे हित साधणे, सर्वांची कामे करणे हीच आमच्या कामाची पद्धत आहे,’ असेही पवार म्हणाले.
Read Also :
- पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको – सुजय विखे पाटील
- मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील
- त्रिपुरात असं काही घडलंच नाही, हे एक सुनियोजित षडयंत्र; अमरावतीतील हिंसाचारावर फडणवीसांचा संताप
- अमरावतीत 144 कलम लागू; आंदोलकांनी टपरी जाळली, दंगानियंत्रक पथके तैनात
- त्रिपुरातील घटनेची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही; हिंसक आंदोलनावरून प्रविण दरेकर आक्रमक