बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंडेंच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली.
धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. भाजप ओबीसी समाजाच्या नेत्यांमागे उभी राहत नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात दोष नसेल तर पाठीमागे ताकदीनिशी उभा राहील, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. जयंत पाटील यांनी जातीचा उल्लेख केल्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
आता ‘राज्यात ओबीसी समाजातील नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवलं जात आहे’, असे वक्तव्य भाजप नेते बाळासाहेब सानप केले आहे. न्यूज18 ने याबाबत वृत्त दिले आहे.
महाराष्ट्रात कोळी समाजाला आरक्षणातून, शिक्षणातून, नोकरीतून आणि राजकारणातून संपवण्याचे कट-कारस्थान ओबीसींच्या लक्षात आले. त्यामुळे आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
Read Also :
- ‘कोण आहे जेपी नड्डा ? मी त्यांना का उत्तर देऊ ?’, राहुल गांधींचा निशाणा
- संसदेत खासदारांना मिळणाऱ्या जेवणावरील अनुदान बंद, पदार्थ महागणार
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची वर्णी ?
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस