नवी दिल्ली : संसद भवनातील उपहारगृहात खासदारांना आतापर्यंत अगदी कमी दरात जेवण उपलब्ध होत असे. मात्र आता येथे मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत. संसदेतील उपहारगृहात मिळणाऱ्या जेवणावर दिले जाणारे अनुदान बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
याआधी संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणांची प्लेट अवघ्या 35 रुपयांना मिळत होती. अनुदान रद्द केल्याने लोकसभा सचिवालयाची दरवर्षी अनेक कोटी रुपयांची बचत होणार आहे. अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
याशिवाय यापुढे संसदेतील उपहारगृह उत्तर रेल्वेऐवजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी) यांच्याकडून चालविले जाणार असल्याची माहिती देखील ओम बिर्ला यांनी दिली.
दरम्यान, 29 जानेवारी ते 8 एप्रिल या कालावधीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
Read Also :
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची वर्णी ?
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’