मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर इडीची कारवाई झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी नवाब मलिक यांच्या बाजूने तर विरोधी पक्ष भाजपाने नवाब मलिक यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरून सध्या नवाब मलिक यांची खिल्ली उडवण्याचा देखील भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न झाला.
…म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल
भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी ट्विटवर नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच! असं म्हणत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर शाब्दिक टोला हाणला आहे.
मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….!
असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही.
पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 23, 2022
भाजप पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्या झालेल्या कार्यवाही बाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरून सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दाऊद इब्राहिम या अंडरवर्ल्डशी संबंधित नवाब मलिक यांनी व्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
Read also:
- कायद्याचा गैरवापर करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही; राष्ट्रवादीचा सूचक इशारा
- मोठी बातमी: अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक, महाविकास आघाडीला मोठा धक्का
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसोबत लबाडी करत आहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- …तर नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांची सरकारकडे मागणी
- …त्यामुळे किशोरी ताई यांचे आभार? नितेश राणेंनी पुन्हा मुंबईच्या महापौरांना डिवचले