मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रीग प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटक आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इडीच्या कार्यालयात बाहेर मोर्चा काढला आहे. तर नवाब मलिक यांच्यावर इडीची चौकशी सुरू झाल्यापासून राज्यातील अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी खास यासंदर्भात एक कविता सोशल मीडियावर शेअर करून निषेध नोंदवला.
आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर कविता शेअर केली आहे. सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी,
सलते सत्तेवरील महा-आघाडी म्हणून कमळाबाई ती लाविते काडी, तपासयंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी,
पाकळ्यांमध्ये नाहीत का काहीच भानगडी?पण लक्षात ठेवा…पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी अशी कविता अमोल कोल्हे यांनी शेअर केली आहे.
सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?पण लक्षात ठेवा…
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी#WeStandWithNawabMalik pic.twitter.com/kaw7AfG8Xj— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १९८३च्या मुंबईतील बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदी करण्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रीग प्रकरणी नवाब मलिक यांची आज सकाळपासून इडीकडून चौकशी सुरू आहे. मालमत्तेच्या व्यवहारसंबंधी मलिकांची ही चौकशी सुरू आहे.
वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
मुंबईतील कुर्ल्यातील ३ एकर जागेशी नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांच्याकडून ३० लाखांत खरेदी तर २० लाख रूपायाचं पेमेंट केलं आहे. मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं २००५ साली शहावली, सलीम पटेलांकडून व्यवहार केले असल्याचं फडणवीस म्हणाले. २००५ मध्ये कुर्ल्यातील जमीनाचा भाव २०५३ स्केअर फुट होता मात्र नवाब मलिक यांनी ती जमीन २५रूपये स्केअर फुटांनी खरेदी केली. जमीनीची पॉवर आँफ अटर्नी सलीम पटेल यांच्या नावावर आहे तर विक्री सरदार वलीच्या नावावर केली आहे मात्र कागदावर सही ही नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी केली आहे. मुंबईच्या हत्यारांकडून ही जमीन विकत घेण्याची काय गरज होती असा सवाल ही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Read also:
- मोठ्या नेत्यांची नावे बाहेर काढल्याने ईडीकडून ‘राग’ काढण्याचा प्रकार सुरु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
- महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार
- गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी