अमरावती : महाविकास आघाडीच्या माध्यमातून साखर कारखानदार, दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय. या टोळक्याने जर उस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरावर कायदेशीररित्या दरोडे टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायदा हातात घेऊन हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. यावर्षीही आम्ही एकरकमी एफआरपी घेतली आहे. कारखानदार आणि सरकारमध्ये जर हिंमत असेल तर दोन टप्प्यांत एफआरपी देऊन २२०० रुपयांची पहिली उचल देणार असं सांगत साखर कारखाने सुरु करुनच दाखवा. रणसंग्राम जवळच आहे, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.
मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटील
राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारला सरकारमधील नेत्यांच्या नाराजीचा वारंवार सामना करावा लागत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र आले असले तरीही खालच्या पातळीवर अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि नेत्यांचं मनोमिलन झालेलं नाही, ज्यामुळे अनेकदा तिन्ही पक्षांमध्ये खटके उडताना पहायला मिळालं आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधला प्रमुख घटक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आता सरकारला घरचा आहेर दिला आहे.
खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने
उस उत्पादक शेतकऱ्यांकडून एकरकमी एफआरपीची मागणी होत असताना महाविकास आघाडी सरकारने या एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टींनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. उसदर नियंत्रण समितीच्या सूत्रात बदल करायचा असेल तर तो संसदेला करावा लागेत, तो अधिकार कोणत्याही राज्याला दिलेला नसल्याचं शेट्टींनी सांगितलं. राज्य सरकार एफआरपी दोन टप्प्यांत देण्याचं परिपत्रक काढूच शकत नसून हे बेकायदेशीर असल्याचंही शेट्टी म्हणाले.
Read also:
- वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
- लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला
- सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश
- 35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे