मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या संघर्षात केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरु आहे असा सूरही राजकारण्यांकडून पाहायला ऐकायला मिळत आहे.
हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली*
आगामी महिन्यांमध्ये पुणे, मुंबईसहित इतर चार महानगरपालिकांच्या निवडणूका महाराष्ट्रात होणार आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपकडून आता कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हा बँकेत भाजपचा सुपडा साफ; महाविकास आघाडीचा १५-०ने मोठा विजय
यातच देशात भाजपला टक्कर देण्यासाठी परवा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले होते. यावरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी कितीही एक येऊ द्या, मात्र जनता भाजपसोबत आहे. निवडणुका अर्थमॅटिक ने नाही तर पॉलिटिकल केमिस्ट्रीने जिंकल्या जातात हे लक्षात असू द्या.
भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? भाजप नेते किरीट सोमय्या संतापले
शिवछत्रपतींचा भगवा आता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ आपली आहे. काही तो केवळ मिरवत आहेत. या भगव्याचे रक्षण करायचे आणि तो सतत फडकत राहिला पाहिजे, ही जबाबदारी आता भाजपाने कार्यकर्त्यांच्या बळावर घेतली आहे, असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात फोटो टाकत आपले विचार आक्रमकतेने मांडले आहेत. महाराष्ट्रात सध्या कुणाचे सरकार आहे हे कळतच नाही. शिवसेनेचे नाव न घेता फडणवीसांनी म्हटलं आहे की मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्रात यांचं किती अस्तित्व आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि हे मुंबईतच सांगू राहिलो असा टोला देखील हाणला आहे.
Read also:
- 35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे
- खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने
- मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटील
- २०२४ ला तिसरी आघाडी होणार, भाजपला सत्तेतून हद्दपार करणार; नवाब मलिकांचा दावा