मुंबई : भाजप नेते किरीट सोमैया यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबागमधील कोर्लई गावात १९ बंगल्याचा कर भरलेला आहे असा आरोप केला होता . त्यावरून आता राजकारण चांगलेच पेटले आहे. जर बंगले असतील तर राजकारण सोडेल अशी प्रतिज्ञा संजय राऊत यांनी केली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण कमालीचं तापलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात दौऱ्यावर येण्याच्या आधी भाजपकडून शिवसेनवर टीका करण्यात आली होती. भाजप नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारून ही चर्चा सुरु आहे का ?.
मी तर भाजीवाला माणूस, त्या चंद्रकांत पाटलांनी…; छगन भुजबळांनी काढला चिमटा
त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांची जीभ घरसली आहे. हे लोक चु * आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली. चुतिया या शब्दावर संजय राऊत यांनी कमालीचा जोर दिल्याचे पत्रकार परिषदेत समोर आले आहे.
नितेश राणेंचे संचाकलपद धोक्यात येण्याची शक्यता ; जिल्हा बँकेचा थकीत असल्याने राणेंची अडचण होणार?
विरोधक हे नामर्दासारखे टीका करत आहेत. १० मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणं हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. अशा चु## लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते असे खडेबोल देखील राऊतांनी सुनावले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची पायाभरणी होईल. या भेटीत देशाच्या आगामी वाटचालीबाबत दिशा निश्चित केली जाईल असा आशावाद देखील संजय राऊतांनी बोलून दाखवला आहे.
Read also:
- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून पार्थ पवार ‘साईड स्ट्राईक’; भूमिका ठरवण्याची हिच ती वेळ!
- किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या
- सिंधुदुर्गात आतापर्यंत ७ हत्या, राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊतांची गृहमंत्र्याकडे मागणी
- एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
- “रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा