मुंबई : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. विनायक राऊत यांनी यावेळी सिंधुदुर्गात झालेल्या राजकीय हत्यांच्या मागे कुणाचा हात होता हे शोधून काढण्यासाठी त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार असल्याचं सांगितलं.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !
सिंधुदुर्गात आजवर झालेल्या राजकीय हत्यांच्या प्रकरणात आजवर खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांच्या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी शिवसेना करणार आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचं ट्विट नारायण राणे यांनी केलं होतं. मग केंद्रीय मंत्र्यानं ईडीच्या नावाचा दुरूपयोग करुन एखाद्याला अशी धमकी देणं पदाचा दुरुपयोग नाही का?, असा सवाल विनायक राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत राणेंनी हातमिळवणी केली आहे का? की ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रं चोरी केली आहेत का? कारण त्यांनी ट्विट केलेली माहिती त्यांना मिळालीच कुठून आणि मिळाली नसेल तर एका खासदारानं असं ट्विट करणं शोभतं का? असे सवाल करत विनायक राऊत यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचं यावेळी म्हटलं.
Read also:
- एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
- “रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा
- नितेश राणेंचे संचाकलपद धोक्यात येण्याची शक्यता ; जिल्हा बँकेचा थकीत असल्याने राणेंची अडचण होणार?
- मी तर भाजीवाला माणूस, त्या चंद्रकांत पाटलांनी…; छगन भुजबळांनी काढला चिमटा
- कल्याण-डोंबिवलीत भाजपला धक्का; चार माजी नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण