मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून नोकरी आणि कुटुंबाला दावणीला लावून संप सुरू ठेवणाऱ्या राज्यातील ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता उच्च न्यायालयाकडे लागले आहे. मंगळवारी (ता. २२) उच्च न्यायालयात एसटीच्या विलनीकरणाचा अहवाल खुला होण्याची शक्यता आहे. अहवाल आपल्या बाजूने येईल, अशी आशा हजारो एसटी कर्मचाऱ्यांना आहे. नकारात्मक आल्यास आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
भXXचा अर्थ संजय राऊतला कळतो का? भाजप नेते किरीट सोमय्या संतापले
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने विलनीकरणासंदर्भात तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीने गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयात आपला अहवाल सोपवला होता. पहिल्या दिवसापासून आझाद मैदानावर शड्डू ठोकून असलेल्या महिला एसटी कामगार संध्या दहिफळे अहवालाबद्दल खूप सकारात्मक आहेत. तीन महिने त्या कुटुंबियांपासून दूर आहेत. ऊन, पाऊस आणि थंडी सहन करत आम्ही आंदोलनावर ठाम राहिलो. आता शेवट गोड होईल. आम्ही जिंकू. राज्यात एसटी कामगार दिवाळी साजरी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
२०२४ ला तिसरी आघाडी होणार, भाजपला सत्तेतून हद्दपार करणार; नवाब मलिकांचा दावा
नांदेड विभागातील बिलोली आगारातील कर्मचारी श्रीनिवास पांचाळे यांची १० वर्षांची मुलगी शर्वरी आणि नऊ वर्षांचा मुलगाही आझाद मैदानावर आला आहे. तीन महिन्यांच्या लढाईचा शेवट गोड होईल, अशी आशा त्यांच्या दोन्ही मुलांना लागली आहे. पांचाळे म्हणतात, अनेक दिवसांपासून कुटुंब वाऱ्यावर सोडून आम्ही सर्व आझाद मैदानावर आंदोलन करत आहोत. दरम्यान, आमच्या ४० पेक्षा जास्त कामगार बंधूंनी आत्महत्या केली. न्यायालयाने आम्हाला न्याय दिल्यास आमचे कुटुंब सुरक्षित राहील; अन्यथा आम्ही देशोधडीला लागू असे ते म्हणाले.
Read also:
- सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश
- 35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे
- खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने
- मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटील