औरंगाबाद : आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राज्यात राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका या भारतीय जनता पक्षासोबत लढणार असल्याचे सांगितले आहे
मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटील
ते पुढे बोलताना म्हणाले की, आमचा पक्ष सर्व जिल्ह्यात, तालुक्यात असल्याने प्रत्येक ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यानंतरही आमच्या पक्षावर त्याचा काही परिणाम झाला नाही. प्रतिगामी भाजपसोबत युती केल्याच्या लोकांच्या टीकेबद्दल बोलताना म्हणाले की, भाजप जरी प्रतिगामी असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका नरेंद्र मोदी हे नेहमी मांडत आहेत. नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर घेतला होता. दलितांच्या आरक्षणासाठी त्यांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे प्रतिगामी माणसांना पुर्वगामी करण्यासाठीच आंबेडकर चळवळ असल्याचंही त्यांनी सांगितले.
खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर राडा; भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने
दलितांबद्द्ल असुया आणि त्यांच्या बद्दल जो विरोध आहे तो नाहीसा तसेच यामध्ये परीवर्तन करण्यासाठी आंबेडकर चळवळ उभारली आहे. देशात समता स्थापन करण्यासाठी सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. भारतीय जनता पक्ष हा बहुजन, दलित या सर्वांच्याच पाठिंब्यावर सत्तेत आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत इतक्या जागा मिळत आहेत. त्याचबरोबर मी प्रतिगाम्यांसोबत गेलो असं आजीबात नाही. भाजप हा पुर्वगामी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे
महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने आनंद झाला आहे. परंतु त्यांची सध्या तब्येत ठिक नाही. आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसमुळे त्यांना निर्णय घेता येत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे निर्णय महत्वाचे असतात. परंतु ते घेतले गेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्या पक्षांच्या चक्रव्यूहात न राहता त्यातून बाहेर पडून भाजपसोबत युती केली पाहिजे. त्याचबरोबर जे आरोप-प्रत्यारोप चालले आहेत ते थांबवले पाहिजे. त्याचबरोबर आगामी काळात भाजपसोबत शिवसेनेने युती करण्यासंदर्भात स्वतः मी संजय राऊत यांच्याशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले.
Read also:
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
- वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
- लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला
- सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश
- 35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा