मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. कोणत्या कारणासाठी नवाब मलिक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हा परिषदेचा सभापती ५ टक्के कमिशन मागतोय; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
एका जमिनीच्या व्यवहारासंबंधी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून मंत्री नवाब मलिक यांच्यावर सध्या ईडीकडून राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे. ते म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे.
आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे. अलीकडे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढली होती. या प्रकरणांमध्ये मोठी नावे समोर आली आहेत. म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहे.
लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला
नेमकं कोणत्या प्रकरणामध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी नेण्यात आले आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. लवकरच याबाबत खुलासा करण्यात येईल असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also:
- महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार
- गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
- वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?