मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रीग प्रकरणी स्फोटक आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मागे देखील आता इडीचा ससेमिरा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
…तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर
रोहित पवार पुढे म्हणाले की, कोणत्याही नोटीसा शिवाय कोणत्याही मंत्र्याला ताब्यात घेऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी भाजप, केंद्राच्या विरोधात अनेक प्रकाराचे कागदपत्रे सादर केली आहेत. कदाचित त्याच्यामुळेच आज त्यांच्यावर इडीची कारवाई झाली असावी. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सध्या समाजवादी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित होतंय . त्याठिकाणी निवडणुकीत भाजपची पीछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेश मधील जनतेला असा संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याला आम्ही कोणतेही नोटीस न देता ताब्यात घेऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी मतदान अजून बाकी आहे, तेथे आमचा ऐका नाही तर अशा पद्धतीची कारवाई करु असा संदेश उत्तर प्रदेश मध्ये भाजपला द्यायचा आहे.
जिल्हा परिषदेचा सभापती ५ टक्के कमिशन मागतोय; खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणलं. तसेच गुजरातमध्ये २२ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. त्यामुळे याठिकाणी असलेलं रँकेट गुजरात मध्ये जाईल की काय, अशी भीती कदाचित त्यांना असणार. हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचंही रोहित पवार म्हणाले.
आयुक्तावरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून ट्रान्झिट बेल मंजूर
त्यांनी पुढे सांगितले की, आगामी काळात मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नवाब मलिक मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नवाब मलिक देखील या निवडणुकीत लक्ष घालणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारे अडकून ठेवून त्याचा फायदा घ्यायचा. राजकीय दृष्टिकोनातुन एखाद्या व्यक्तीची हानी करायची आणि त्यातून भाजपला फायदा करायचा. अशा हेतुपुरस्सर ही कारवाई झाली असेल तर ती पुर्णपणे चूकीची आहे.
Read also:
- गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
- वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
- लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला