पुणे : राज्य सरकारने दुकानात दारू विक्रीचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. यावर विरोधी पक्षांनी देखील राज्य सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील यावर आपली भूमिका सादर केली. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात राज्य सरकारच्या विरोधात उपोषण देखील सुरू केले होते. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला
राज्य सरकारने सुरू केलेल्या दारू विक्रीच्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या की, आम्ही पुर्णपणे नशामुक्तीच्या बाजूने उभे आहोत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४७ नुसार सरकारचे कर्तव्य आहे की, त्यांनी दारूबंदी करावी आणि सकस आहार खायला द्यावा. कोणत्याही कुटुंबाना जे आठ किलोचं धान्य मिळतंय ते फक्त पाच दिवसांसाठी आहे. अशा परीस्थितीत दारू मिळणं, आणि तेल हे दारूपेक्षा महाग असणं हे आम्हाला मंजूर नाही.
वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
प्रत्येक राज्य सरकार म्हणतंय की, दारूच्या विक्रीमधून आम्ही शाळा चालवणार. हे महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार पापाचं पैसे वापरणं आहे. याच्याऐवजी तुम्ही योग्य मार्गाने पैसे कमवा, रोजगार वाढवा, मनुष्यबळ वाचवा. देशात जे मृत्यू दारूच्या नशेमुळे होत आहेत. त्यात देशातील तरूण विद्यार्थी देखील बळी पडत आहे. हे सगळं थांबवा अशी आमची आग्रहाची मागणी आहे. अण्णा हजारे यांची मी संपूर्ण भूमिका बघितली नाही. परंतु त्यांची भूमिका जर दारूबंदीच्या बाजूने असेल तर त्यांना नक्कीच आमचा पाठिंबा असणार.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
अलिकडेच राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाईन उद्योगास चालना देण्यासाठी दुकानामध्ये दारू विक्रीचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला होता. त्यानुसार दुकानात दारू विक्री करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांसह राज्यातील अनेक संघटना, व्यक्तींकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
Read also:
- तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?
- चारी मुंड्या चीत करणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला खडसेंचा पलटवार; म्हणाले..;
- राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांमध्येच रंगली जुगलबंदी; कुणाची सत्ता तर कुणाचं काय?
- भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार लवकरच..; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांनी दिली माहिती
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले