मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. आर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर के.सी आर. यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेऊन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी तयार करण्याचे संकेत दिले. तसेच राज्यात आगामी काळात महापालिकेच्या देखील निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी काही राजकीय नेते पक्ष मेळावे देखील घेत आहेत. यावरून सध्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये चांगली जुगलबंदी बघायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीसांना नैराश्य आलयं, जास्त लक्ष देवू नका – आदित्य ठाकरे
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या राजकीय भेटी बद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, यापूर्वी म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बिगरभाजप पक्षाचे महागठबंधन तयार करण्यात आले होते. तसेच अशी ही हवा तयार करण्यात आली होती की, भाजपला निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ३०३ जागा जिंकून बहुमत मिळवले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आणखी जागा वाढणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा वाढतील. परंतु भाजपाविरोधी पक्षांनी निवडणूकीत जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करायला आणि आशा ठेवायला काही हरकत नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्त्यांवरून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी सैन्य तयार ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांना केले.
सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश
ते पुढे म्हणाले की, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज राहायला हवे, त्यासाठी सैन्य तयार ठेवा. प्रत्येक मतदान बुथवर आपण लक्ष द्यायला हवे. त्याठिकाणी आपण नेहमी प्लसमध्ये राहायला हवे. जर मायनस मध्ये आपण जात असेल तर त्याचा अभ्यास करा, असं जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी केलेले दावे खरे ठरणार की नाही, हे पाहाणं महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार लवकरच..; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांनी दिली माहिती
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी
- वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?
- लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला