औरंगाबाद : खासदाराच्या मतदारसंघात विकास निधी देण्यासाठी जिल्हा परिषदच्या बांधकाम सभापतीने चक्क ५ टक्के कमिशन मगितल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली असून, थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टॅग करत लक्ष देण्याची मागणी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले
जलील यांनी ट्विट करता म्हटल की, माझ्या मतदारसंघासाठी विकास निधी देण्यासाठी बांधकाम सभापती बलांडे ५ टक्के मागत आहेत. असे भ्रष्ट व्यवहार कधीच पाहिलेले नाहीत. कृपया हे थांबवा, असं जलील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
@CMOMaharashtra @AUThackeray औरंगाबाद जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याची विनंती. माझ्या मतदारसंघासाठी विकास निधी देण्यासाठी बंधकाम सभेपती बलांडे 5 टक्के मागत आहेत! असे उघड भ्रष्ट व्यवहार कधीच पाहिलेले नाहीत. कृपया हे थांबवा.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) February 21, 2022
तर यावर माध्यमांना बोलताना जलील म्हणाले की, रस्त्यासाठी साडेआठ कोटी निधीचे जि.प. कडे प्रस्ताव दिले, पालकमंत्र्यांनी निधी वाटपाची यादी अंतिम केल्याचे सांगून सभापती बलांडेंनी ५० लाख रुपये दिल्याचे सांगितले. माझ्या माणसाकडे ५ टक्के कमिशन मागितले. मी बलांडेंना फोन केला असता त्यांनी माझ्याकडेही कमिशन मागितले. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले. दरम्यान, बलांडेंनी स्वत:वरील आरोप फेटाळून लावले असून खासदार जलील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचं सांगितलं आहे.
Read also:
- …तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर
- तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?
- चारी मुंड्या चीत करणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला खडसेंचा पलटवार; म्हणाले..;
- राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांमध्येच रंगली जुगलबंदी; कुणाची सत्ता तर कुणाचं काय?
- भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार लवकरच..; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांनी दिली माहिती