नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या एक्स खात्यावरून माहिती दिली आहे. लालकृष्ण आडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आता नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे या विचाराने रथयात्रा काढून आडवाणीजींनी जनजागृती केली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर आडवाणीजींच्या योगदानाचे स्मरण ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार जाहीर केला, हे आपल्या भारतीय संस्काराचे द्योतक म्हणावे लागेल. असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा…शिंदेंच्या राजवटीत गुंड, टोळ्यांच्या हातात कायदा ; भाजप आमदाराचा गोळीबार, विरोधक संतापले
दरम्यान, आणीबाणी आणि त्यानंतर ढवळून निघालेल्या राजकीय पटलावर जनसंघ आणि भाजपच्या माध्यमातून देशहिताचा विचार मांडत राहून त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका कायम चोख निभावली. उपपंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राजकारणातील तरुण पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावणाऱ्या आडवाणी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्रीही अनोखी होती. हिंदुत्वाचा विचार आणि श्रीरामाचा ध्यास असलेली ही दोन व्यक्तिमत्वे सकारात्मक राजकीय साथीदार होते. भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना प्रणाम. असंही शिंदे म्हणाले.
हेही वाचा…शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का केला ? भाजप आमदारने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत.
अडवाणी यांची सार्वजनिक जीवनातील अनेक दशके चाललेली सेवा पारदर्शकता आणि सचोटीच्या अटल वचनबद्धतेने चिन्हांकित केली गेली आहे, ज्याने राजकीय नैतिकतेमध्ये एक अनुकरणीय मानक स्थापित केले आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा बहुमान मानेन. असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”
हेही वाचा…मोठी बातमी….! लालकृष्ण आडवाणी यांना “भारतरत्न पुरस्कार” जाहीर, नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
हेही वाचा….“संजय गायकवाड तुझं ‘राजकीय कवाड’ ओबीसी व मराठा मिळून बंद करतील”, अन् रूपाली पाटील संतापल्या
हेही वाचा..“आपला ‘बॉस सागर’ बंगल्यावर बसलाय या कॉन्फिडन्समध्ये भाजप आमदाराचा गोळीबार,” प्रकरण तापलं
हेही वाचा“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील”, गो’ळी’बा’र प्रकरण..!