मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमीनीच्या वादातून शिंदे गटाचे प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीनीचा वाद सोडविण्यासाठी दोघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याने कायदा -सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली असून या घटनेवरून त्यांनी संतापही व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“ईडीला हाताशी धरून सुडाच्या राजकारणावरून भापजला फटका बसणार ?” राज ठाकरेंचा हल्लाबोल
मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे गोळीबार केल्याचे गणपत गायकवाड म्हणत आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार निर्माण होतील. असे विधान त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुंड, गुन्हेगारांच्या टोळ्यांना, तसेच उद्याच्या निवडणुकीत गुंडांची मदत मिळावी, यासाठी पुणे, नाशिक, ठाणे सारख्या तुरूंगातून जामीनावर बाहेर काढण्यात आले आहेत. असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पुण्यात गुंड प्रमुखांना राजकारणासाठी जामीनावर बाहेर काढण्यात आले. त्यातील एका गुंडाचा खून झाला. महाराष्ट्रातील कायदा हा गुंडांच्या हातात दिला आहे. महेश गायकवाड यांच्यावर एका गुंडाने गोळीबार केला आहे. मग कुठे आहेत राज्याचे गृहमंत्री ? असा सवालही राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…“तर मी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार”, वडेट्टीवारांनी उपोषणाचा का दिला इशारा?
कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. एका आमदाराने गोळीबार केल्यानंतरही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. तसेच सामान्य माणसाने असा कायदा हातात घेतला असता तर त्याला विनाचौकशी केली असता त्याला फासावर लटकवला असतं. असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच नागपुर, पुणे, मुंबई अशा शहरात फक्त निवडणुका जिंकण्यासाठी राजकारणातील विरोधकांवर असे गुन्हेगार तुरूंगातून सोडलेले आहेत. आपल्या राज्यात काय चालललं आहे ? गणपत गायकवाड यांनी दिलेले निवेदन सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते तीनपेक्षा जास्त काळ आमदार असून महाराष्ट्रात शिंदेंच्या राजवटीत गुन्हेगारांची पैदास सुरू झाली आहे. हे भाजपच्या आमदार सांगत आहेत. त्यावर आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पिलावळाने उत्तर दिलं पाहिजे. असेही संजय राऊतांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटातील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार का केला ? भाजप आमदारने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले….
हेही वाचा..भाजपच्या ‘या’ आमदाराने केला शिंदे गटाच्या नेत्यावर गो’ळी’बा’र’, थरारक घटना
हेही वाचाराज्य सरकारचा मोठा निर्णय, मनोज जरांगे पाटलांना आता सरकारची सुरक्षा, पोलिस तैनात
हेही वाचा…“उद्धव ठाकरे जे वचन देतो, ते पूर्ण करतो”, ठाकरेंनी थेट मोदींना डिवचलं
हेही वाचा…कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, हातकणंगलेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचं निधन