मुंबई : मुंबईच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या कोस्टर रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते यावेळी कोस्टर रोडचं उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण केलं जाणार असून १५ मे पर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“विजयोत्सव साजरा झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? “राज ठाकरेंचा जरांगे पाटलांना सवाल
वरळी ते नरिमन पॉईंट या सागरी महामार्गाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. त्याचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान १९ तारखेला येताहेत. म्हणजे एक गोष्ट चांगली झाली, उद्धव ठाकरे जे वचन देतो, ते पूर्ण करतो; याला साक्ष आता देशाचे पंतप्रधान असणार आहेत. असं उद्धव ठाकरे यांनी म्हसळा शहर रायगड येथील सभेत बोलतांना सांगितले.
हेही वाचा…“भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढा,” शिंदे गटाच्या आमदाराची मागणी, छगन भुजबळ म्हणाले…
मला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून सन्मान मिळाला. ते श्रेय माझ्या जनतेचं आणि प्रशासनाचं आहे. परंतु भाजपचं जे धोरण आहे. घराणेशाहीला विरोध. ते धोरण आम्ही स्विकारतो आणि राजकारणातून निवृत्त होतो. असं तटकरेंनी जाहीर करावं. असं आवाहन देखील त्यांनी दिलं. तसेच एवढ़्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव हिंदुत्व मान्य करून माझ्यासोबत येत आहेत. तर भाजपला काय अधिकार आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणण्याचा ? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, हातकणंगलेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचं निधन
हेही वाचा…“ईडीला हाताशी धरून सुडाच्या राजकारणावरून भापजला फटका बसणार ?” राज ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा“तर मी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार”, वडेट्टीवारांनी उपोषणाचा का दिला इशारा?
हेही वाचा…“कोस्टल रोड, महाविकास आघाडीचा प्रकल्प… निवडणूक तोंडावर पंतप्रधान अर्धवट कामाचे उद्घाटन करणार!”
हेही वाचा…संजय गायकवाडांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन आंदोलन