कोल्हापुर : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे अलिकडेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनावरील शोककळा संपेना ना संपे लगेचच एका मोठ्या राजकीय नेत्याच्या निधनानं महाराष्ट्र हळहळून गेला आहे. हातकणंगले नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरूणकुमार जानवेकर यांचे शुक्रवारी ह्यदयविकाराने निधन झाले आहे. ते ४५ वर्षाचे होते.
हेही वाचा…“भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढा,” शिंदे गटाच्या आमदाराची मागणी, छगन भुजबळ म्हणाले…
हातकणंगले नगरपरिषदेची पहिली सार्वत्रित निवडणूक डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. तेव्हा कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर ते नगराध्यक्ष म्हणून निवडणून आले होते. या वर्षीच्या डिसेंबर अखेर त्यांचा कार्यकाळ होता. या निवडणुकीत निवडून आलेले ते कॉंग्रेसचे एकमेव उमेदवार होते.
हेही वाचा…“महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात, गेंड्याच्या कातडीचे सरकार कारवाई का करत नाही” ?
दरम्यान, सर्व पक्षातील नेत्यांशी जवळीक तसेच सर्व पक्षांना समान न्याय देऊन शहराच्या विकासासाठी त्यांची धडपड सुरू होती. मनमिळावून स्वभावाचे जानवेकर यांचे अशा पद्धतीने निधन झाल्याने संपुर्ण शहारावर शोककळा पसरली आहे. यापुर्वी त्यांच्या पत्नी अर्चना जानवेकर या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार राजू आवळे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते.
READ ALSO :
हेही वाचा…“ईडीला हाताशी धरून सुडाच्या राजकारणावरून भापजला फटका बसणार ?” राज ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा“तर मी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार”, वडेट्टीवारांनी उपोषणाचा का दिला इशारा?
हेही वाचा…“कोस्टल रोड, महाविकास आघाडीचा प्रकल्प… निवडणूक तोंडावर पंतप्रधान अर्धवट कामाचे उद्घाटन करणार!”
हेही वाचा…संजय गायकवाडांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन आंदोलन
हेही वाचा…“विजयोत्सव साजरा झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? “राज ठाकरेंचा जरांगे पाटलांना सवाल