मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशित आले. त्याठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात आला. कोणता विजय मिळाला ? मराठा बांधव त्या मोर्चाला गेलेले. त्यांना कळलं का ? काय झालं? मग परत उपोषणाला कशाला बसता. असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारी पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. यावर लोकांसमोर मी सांगितलेलं हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा बोललेलो हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे. कायदेशीरबाबी आहेत. असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल. अनेक प्रोसेस आहेत. मला वाटत मराठा समाजातल्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. असेही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश
दरम्यान, राज ठाकरे पुढे म्हणाले की, मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. मागे एकदा मराठा समाजाला तापवलं. ते सर्व मुंबईत मोठ्या संख्येने आले. आता दुसऱ्यांदा मुंबईत मोर्चा काढण्यात आला. पण वस्तूस्थिती आपण पाहणार आहोत की नाही ? कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे म्हणून आपल्याला मोर्चासाठी नेले जात आहे. याचा विचार प्रत्येक समाजाने केला पाहिजे. असेही राज ठाकरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा“भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढा,” शिंदे गटाच्या आमदाराची मागणी, छगन भुजबळ म्हणाले…
हेही वाचा…“महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात, गेंड्याच्या कातडीचे सरकार कारवाई का करत नाही” ?
हेही वाचा…“आज शिवराय असते तर शेलारांसारख्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी कडेलोट केला असता”, रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..