मुंबई : सोमनाथ मंदिरांची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळेला देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या हस्ते सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आली. वर्षानुवर्ष लढा चालेला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात अंतिमता न्याय मिळाला. तो हा राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. त्यामुळे हे देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपतीला आमंत्रित करा, अशी मागणी आमची मागणी आहे. परंतु ते करतील किंवा नाही करणार हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आमच्याकडून गोदावरीला २२ जानेवारीला आरती आणि काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. त्यासाठी आम्ही राष्ट्रपतींना आमंत्रित करणार आहोत. असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा…“१४ तारखेला महायुतीचा महामेळावा”, मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार ?
येत्या २२ जानेवारीला मोठा सोहळा पार पडतो. जसं सोमनाथ मंदिराच्या वेळी देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना बोलवण्यात आलं होतं. तशाच पद्धतीने राष्ट्रपतींना देखील बोलवण्यात यावं. शंकराचार्य यांनी देखील मोठी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु आम्ही नाशिक येथे जाणार आहोत. त्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित केलं आहे. त्यामुळे त्यांनी यावं असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मोदीजी पंतप्रधान झाले अन् विकास कामांना गती मिळाली”, फडणवीसांकडून मोदींचं भरभरून कौतूक
दरम्यान, मी देशभक्त आहे. अंधभक्त नाही. असं म्हणत कारसेवकांनी धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं. राम मंदिर हा कारसेवकांचा गौरव आहे. झेंडे लावायला अनेक येतात पण लढण्याची वेळ होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात ? असा सवाल ठाकरेंनी भाजपला केला आहे. यातच शिवसेनेची पहिली घोषणा होती की पहले मंदिर फिर सरकार. मी अयोध्येला नक्की जाणार. राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही, ज्या ज्यावेळी माझ्या मनात येईल त्या त्यावेळी मी राम मंदिरात जाणार. असेही ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…“आधी मटका अड्ड्यावर छापा, मग बोलवले पोलिसांना”, भाजपच्या माजी महिला आमदाराची एकच चर्चा
हेही वाचा…पुणे लोकसभा जिंकायचीय मग हे निकष पार पाडा, भाजपच्या इच्छूक उमेदवारांना दिले आदेश
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात..” नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान