मुंबई : आजचा दिवस हा स्वप्नपुर्तीचा दिवस आहे. अटलसेतूचे भूमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज तेच उद्घाटन करीत आहेत. ही आमच्या कामाची गती आहे. १९७३ मध्ये या मार्गाची संकल्पना निश्चित झाली होती. त्यानंतर ४० वर्ष काहीच झाले नाही. मोदी पंतप्रधान झाले. काम करण्याची पद्धत बदलली आणि विकास कामांना गती मिळाली. आम्हाला साऱ्या मान्यता तातडीने मिळाल्या आणि या अटलसेतूचे काम सुरू झाले. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतू पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर मुंबईतील विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण, आणि भूमिपूजन पार पडलं त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका, अपशब्द वापरू नका”, नरेंद्र मोदींचं मोठं आवाहन
काही लोकांनी प्लेमिंगोचा प्रश्न निर्माण केला. पण आम्ही पर्यावरणाचे नियम पाळले आणि आज प्लेमिंगोंची संख्यासुध्दा वाढते आहे. राज्याच्या बजेटमधून हा प्रकल्प केला असता तर विलंब झाला असता. आम्ही मोदीजींना विनंती केली. त्यांनी जपानशी बोलून जायकाकडून कर्ज मिळवून दिले. त्यामुळे हा प्रकल्प अतिशय गतीने पुर्ण होऊ शकला. पहिल्यांदा मुंबई आणि एमएमआरला एक प्रकारचा रिंगरोड मिळाला आहे. मोदीजींनी संकल्पाना मांडली की, मुंबईत एका टोकातून दुसऱ्या टोकाला जायचे असेल तर एक तासात पोहोचता आले पाहिजे, ते स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न होता आहे. असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…“स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?” मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा सवाल
आता रायगड आणि नवी मुंबई आता देशाला आणि महाराष्ट्राला ताकद देतील. देशातील ६५ टक्के डेटा बॅक ही या परिसरात आहे. या भागात नवीन विमानतळ होत आहे. त्याचेही भूमिपुजन पंतप्रधान मोदीजी यांनी केले आहे. यावर्षी तेही सुरू करणार आहे. आज सुर्या पाणीपुरवठा योजना आणि इतरही अनेक महत्वपुर्ण प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपुजन झाले आहे. यातून लाखो नागरिकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे. असेही फडणवीस म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली, तिन्ही पक्षांना सामावून घेण्यासाठी समन्वय समितीची स्थापना
हेही वाचा…“महाराष्ट्र रामशास्त्रांच्या छ’दाम शास्त्र्यांचा नाही”, ठाकरे गटाचा नार्वेकरांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मिंधेंना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही,” ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिरांचं स्वप्न मोदींनी पुर्ण केलं,” एकनाथ शिंदेंचं नाशकात मोठं विधान
हेही वाचा…खोके सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, दोन गटाच्या राड्यात महिला डॉक्टराचं डोकं फुटलं