धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. अद्याप जागा वाटपाचा कार्यक्रम झाला नाही. परंतु आगामी काळात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठी माहिती दिलीय.
हेही वाचा…“स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?” मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा सवाल
महायुतीच्या सर्व घटक पक्षांना एकत्रित समावून घेण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीचे गठण करण्यात आले आहे. दर आठवड्याला या समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी सर्वजण मिळून कामाला लागलो आहोत. त्यासाठी रविवार १४ जानेवारी रोजी स्वस्तीक मंगल कार्यालय येथे दुपारी १ वाजता महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा…“एका प्रामाणिक सहकाऱ्याला गमावलं”, युवा संघर्ष यात्रेतला हृषिकेश म्हस्के यांचं निधन, रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीविरूद्ध महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काॅंग्रेस मैदानात आहेत तर महायुतीकडून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता कुणाला जादा जागा मिळणार ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्र रामशास्त्रांच्या छ’दाम शास्त्र्यांचा नाही”, ठाकरे गटाचा नार्वेकरांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मिंधेंना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही,” ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिरांचं स्वप्न मोदींनी पुर्ण केलं,” एकनाथ शिंदेंचं नाशकात मोठं विधान
हेही वाचा…खोके सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, दोन गटाच्या राड्यात महिला डॉक्टराचं डोकं फुटलं
हेही वाचा…“माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका, अपशब्द वापरू नका”, नरेंद्र मोदींचं मोठं आवाहन