मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाबाबत नार्वेकरांनी ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे. तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निवाळाही त्यांनी दिला. यावरून ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टिका करण्यात आलीय. तर आज सामानातूनही नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
हेही वाचा…“एका प्रामाणिक सहकाऱ्याला गमावलं”, युवा संघर्ष यात्रेतला हृषिकेश म्हस्के यांचं निधन, रोहित पवारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे. ते घराणेशाहीवर बोलतात. पण गुलागिरीचे पट्टे गळ्यात बांधून बेताल बडबडतात. त्यांचा उन्माद फार टिकणार नाही. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ट्रायब्युनल ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल व खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील. ती वेळ दुर नाही. महाराष्ट्र रामशास्त्रांचा छ’दाम शास्त्र्यांचा नाही. असा हल्लाबोल देखील सामानातून करण्यात आला.
हेही वाचा…घाटी रूग्णालयात २ गटात राडा, महिला डॉक्टराचं डोके फुटले, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर, शरद पवार गटाची जहरी टिका
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष म्हणून अपात्रेच्या प्रकरणावर निर्णय घेत असताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील? हे पाहाणे माझ्यासाठी क्रमप्राप्त नव्हते. माझ्यासाठी संविधान, विधानसभा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश क्रमप्राप्त होते. या सर्वांचा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून कोणाचे राजकीय नुकसान झालं असेल तर त्याला विधानसभा अध्यक्षांना जबाबदार धरू शकत नाहीत. ज्या लोकांना याचे राजकीय भांडवल करायचे होते. ते दुर्दैवाने होत नसेल. त्यासाठी मी निश्चितपणे जबाबदार नाही. विधानसभा अध्यक्षांची भूमिका राजकारण सोडून असते. त्याकडे राजकीय स्कोप म्हणून पाहणे अन्यायकारक आहे. माझ्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होईल. असे वाटले होते. परंतु तसे होताना दिसले नाही. मात्र., बहुतांश लोकांकडून माझ्या निर्णयाचे स्वागत झाले. असे नार्वेकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मिंधेंना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही,” ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिरांचं स्वप्न मोदींनी पुर्ण केलं,” एकनाथ शिंदेंचं नाशकात मोठं विधान
हेही वाचा…खोके सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, दोन गटाच्या राड्यात महिला डॉक्टराचं डोकं फुटलं
हेही वाचा…“माता, बहिणी मुलींवर शिव्या देऊन नका, अपशब्द वापरू नका”, नरेंद्र मोदींचं मोठं आवाहन
हेही वाचा…“स्वत: न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय?” मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा सवाल