मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास ३० हजार ५०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची भेट दिली आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१, २०० कोटी रूपये खर्च करून मुंबईत उभारण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आलं. तर राज्याच्या विकासावरून मोदींनी महायुतीचंही भरभरून कौतूक केलं.
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिरांचं स्वप्न मोदींनी पुर्ण केलं,” एकनाथ शिंदेंचं नाशकात मोठं विधान
आजचा दिवस मुंबई, महाराष्ट्रासह विकसित भारसासाठी महत्वाचा आहे. देशाचा विकास होणार ही मोदींची गॅरंटी आहे. ३३ हजार कोटींच्या कामाचं आज लोकार्पण करण्यात आलं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकास सुरू आहे. असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत बोलतांना केले. तसेच नवी मुंबई कोस्टल रोडचं काम वेगातसुरू आहे. देशात अनेक एक्स्प्रेसवे बनत आहेत. वंदे भारत रेल्वेमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाल्याचेही मोदींनी यावेळी नमुद केले.
हेही वाचा…खोके सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले, दोन गटाच्या राड्यात महिला डॉक्टराचं डोकं फुटलं
अटल सेतू प्रकल्प जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अॅबे आणि माझा संयुक्त संकल्प आहे. सागरी सेतूचं काम पुर्ण होणं ही मोठी उपलब्धी आहे. अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे. अटल सेतूमळे गोवा देखील मुंबईच्या जवळ येणार आहे. असेही मोदींनी सांगितले. आजचा दिवस हा स्वप्नपुर्तीचा दिवस आहे. अटलसेतूचे भूमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज तेच उद्घाटन करीत आहेत. ही आमच्या कामाची गती आहे. १९७३ मध्ये या मार्गाची संकल्पना निश्चित झाली होती. त्यानंतर ४० वर्ष काहीच झाले नाही. मोदी पंतप्रधान झाले. काम करण्याची पद्धत बदलली आणि विकास कामांना गती मिळाली. आम्हाला साऱ्या मान्यता तातडीने मिळाल्या आणि या अटलसेतूचे काम सुरू झाले. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरम्यान, काही लोकांनी प्लेमिंगोचा प्रश्न निर्माण केला. पण आम्ही पर्यावरणाचे नियम पाळले आणि आज प्लेमिंगोंची संख्यासुध्दा वाढते आहे. राज्याच्या बजेटमधून हा प्रकल्प केला असता तर विलंब झाला असता. आम्ही मोदीजींना विनंती केली. त्यांनी जपानशी बोलून जायकाकडून कर्ज मिळवून दिले. त्यामुळे हा प्रकल्प अतिशय गतीने पुर्ण होऊ शकला. पहिल्यांदा मुंबई आणि एमएमआरला एक प्रकारचा रिंगरोड मिळाला आहे. मोदीजींनी संकल्पाना मांडली की, मुंबईत एका टोकातून दुसऱ्या टोकाला जायचे असेल तर एक तासात पोहोचता आले पाहिजे, ते स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न होता आहे. असेही फडणवीस म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“१४ तारखेला महायुतीचा महामेळावा”, मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार ?
हेही वाचा…“मोदीजी पंतप्रधान झाले अन् विकास कामांना गती मिळाली”, फडणवीसांकडून मोदींचं भरभरून कौतूक
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली, तिन्ही पक्षांना सामावून घेण्यासाठी समन्वय समितीची स्थापना
हेही वाचा…“महाराष्ट्र रामशास्त्रांच्या छ’दाम शास्त्र्यांचा नाही”, ठाकरे गटाचा नार्वेकरांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मिंधेंना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही,” ठाकरे गटाची जोरदार टिका