मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास ३० हजार ५०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची भेट दिली आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१, २०० कोटी रूपये खर्च करून मुंबईत उभारण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आलं. तर राज्याच्या विकासावरून मोदींनी महायुतीचंही भरभरून कौतूक केलं. तर काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…“मिंधेंना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही,” ठाकरे गटाची जोरदार टिका
२०१४ च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. तेव्हा काही संकल्प मी केले होते. आज ते संकल्प पुर्ण होतांना मी बघत आहे. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. मागच्या १० वर्षात भारत बदलला आहे. याची चर्चा होत आहे. १० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता प्रकल्पाची चर्चा होत आहे. असं म्हणत मोदींनी काॅंग्रेसला टोला लगावला.
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंचं राम मंदिरांचं स्वप्न मोदींनी पुर्ण केलं,” एकनाथ शिंदेंचं नाशकात मोठं विधान
दरम्यान, आजचा दिवस मुंबई, महाराष्ट्रासह विकसित भारसासाठी महत्वाचा आहे. देशाचा विकास होणार ही मोदींची गॅरंटी आहे. ३३ हजार कोटींच्या कामाचं आज लोकार्पण करण्यात आलं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकास सुरू आहे. असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत बोलतांना केले. तसेच नवी मुंबई कोस्टल रोडचं काम वेगातसुरू आहे. देशात अनेक एक्स्प्रेसवे बनत आहेत. वंदे भारत रेल्वेमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाल्याचेही मोदींनी यावेळी नमुद केले.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात..” नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
हेही वाचा…“१४ तारखेला महायुतीचा महामेळावा”, मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार ?
हेही वाचा…“मोदीजी पंतप्रधान झाले अन् विकास कामांना गती मिळाली”, फडणवीसांकडून मोदींचं भरभरून कौतूक
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली, तिन्ही पक्षांना सामावून घेण्यासाठी समन्वय समितीची स्थापना
हेही वाचा…“महाराष्ट्र रामशास्त्रांच्या छ’दाम शास्त्र्यांचा नाही”, ठाकरे गटाचा नार्वेकरांवर हल्लाबोल