पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा सलग २८ वर्ष असलेला विजय मोडीत काढला. देशात एकीकडे काॅंग्रेसमुक्त भारतच्या वल्गना करत असतांना पुण्यात असा पराभव होणे भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून पुणे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी निवडीत भाजपने अनेक निकष उमेदवारांसोबत ठेवले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छूक असलेल्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र रामशास्त्रांच्या छ’दाम शास्त्र्यांचा नाही”, ठाकरे गटाचा नार्वेकरांवर हल्लाबोल
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी निश्चित करताना उमेदवाराची ज्येष्ठता, पक्षनिष्ठा, आर्थिक स्थिती अशा अनेक गोष्टी पाहिल्या जाणार आहात. कसब्याच्या निवडणुकीत नेमका याच निकषात भाजपचा उमेदवार कमी पडला असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे या निकषाची आता फार काटेकोर पाहणी करण्यातचे भाजपकडून ठरवण्यात आले आहेत. त्यासाठी सर्वेक्षण, तेही वेगवेगळ्या संस्थाकडून करण्यात येत आहे. पहिला टप्पा झाला असून दुसऱ्या टप्प्याचं कामही जोरात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहेत.
हेही वाचा…“मिंधेंना निमंत्रण अन् खंद्यांना निमंत्रण नाही,” ठाकरे गटाची जोरदार टिका
दरम्यान, भाजपकडून पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी माजी आमदार व माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, यांच्यात स्पर्धा सुरू आहे. तर आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी यांच्यासह विद्यमान शहाराध्यक्ष धीरज घाटे व अन्य काही नावांचीही चर्चा सुरू आहे. याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उमेदवार म्हणून सुनील देवधर यांच्या नावाचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातील बहुतांश उमेदवारांनी सध्या जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“१० वर्षापुर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती, मात्र आता…”मोदींचा काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात..” नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान
हेही वाचा…“१४ तारखेला महायुतीचा महामेळावा”, मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार ?
हेही वाचा…“मोदीजी पंतप्रधान झाले अन् विकास कामांना गती मिळाली”, फडणवीसांकडून मोदींचं भरभरून कौतूक
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली, तिन्ही पक्षांना सामावून घेण्यासाठी समन्वय समितीची स्थापना