मुंबई : मुंबईच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या कोस्टर रोडच्या पहिल्या फेजचं उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते यावेळी कोस्टर रोडचं उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या १० किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण केलं जाणार असून १५ मे पर्यंत दोन्ही फेज सुरू होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
हेही वाचा…“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
आदित्य ठाकरे म्हणाले की, कोस्टर रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरे यांनी जुलै २०१३ मध्ये मांडला होता. त्यानंतर या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. २०१७ ते २०१८ मध्ये कामाला सुरूवात झाली. २०२२ मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत ६५% काम पूर्ण झाले होते. आम्ही दर आठवड्याला, प्रत्येक महिन्यात तेथे भेट देऊन कामाचा आढावा घेत होतो. भारतातल्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीनचे येथे काही फोटो देत आहे. मावळा! कोविडच्या काळात हे मशीन आले, तेव्हा BMC अधिकाऱ्यांनी विचारले, याला काय म्हणायचे? त्यावेळी मी “मावळा” नाव सुचवले…
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
पुढे बोलतांना ते आदित्य ठाकरे म्हणाले की, TBM चे काम पाहिल्यावर लक्षात येते, मुंबईतला मलबार हिल फोडून समुद्राखालचा तो पहिला बोगदा बनवला गेला. TBM च्या ह्या कामाला साजेसं एकमेव नाव… मावळा! अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच, ज्यांनी महाराजांना अशक्य कामातही यशस्वी मदत केली. कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणेघेणे नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचे उद्घाटन करुन निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱ्यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. अशी टिका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.
मुंबई कोस्टल रोड…
कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै २०१३ मध्ये मांडला, त्यानंतर ह्या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला.
२०१७-१८ मध्ये कामाला सुरुवात झाली. २०२२ मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत ६५% काम… pic.twitter.com/RgZuGhuY98
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा…संजय गायकवाडांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन आंदोलन
हेही वाचा…“विजयोत्सव साजरा झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? “राज ठाकरेंचा जरांगे पाटलांना सवाल
हेही वाचा“भुजबळांच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून काढा,” शिंदे गटाच्या आमदाराची मागणी, छगन भुजबळ म्हणाले…
हेही वाचा…“महाघोटाळ्यात सत्ताधीशाच्या पुत्राचा हात, गेंड्याच्या कातडीचे सरकार कारवाई का करत नाही” ?
हेही वाचा…“आज शिवराय असते तर शेलारांसारख्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी कडेलोट केला असता”, रोहित पवारांची जोरदार टिका