मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकार मार्फत सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पत्र देखील लिहिले होते. त्यावर आता राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…संजय गायकवाडांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन आंदोलन
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात असणार आहे. जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे पाटील यांना २४ तास सुरक्षेसाठी दोन पोलीस कॉन्स्टेबल देण्यात आले आहेत.
हेही वाचा…“विजयोत्सव साजरा झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? “राज ठाकरेंचा जरांगे पाटलांना सवाल
दरम्यान, नितेश राणे यांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं होतं की, उपरोक्त विषयान्वये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे, अशी विनंती नितेश राणे यांनी राज्य सरकारकडे केली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरे जे वचन देतो, ते पूर्ण करतो”, ठाकरेंनी थेट मोदींना डिवचलं
हेही वाचा…कॉंग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, हातकणंगलेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांचं निधन
हेही वाचा…“ईडीला हाताशी धरून सुडाच्या राजकारणावरून भापजला फटका बसणार ?” राज ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा“तर मी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करणार”, वडेट्टीवारांनी उपोषणाचा का दिला इशारा?
हेही वाचा…“कोस्टल रोड, महाविकास आघाडीचा प्रकल्प… निवडणूक तोंडावर पंतप्रधान अर्धवट कामाचे उद्घाटन करणार!”