अमरावती: माजी आमदार आणि भाजप नेते डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. आज सकाळीच निर्णय जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमध्ये अन्याय होत असल्याच्या भावनेतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांची घरवापसी झाल्याने काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून भाजपला धक्का बसल्याचीही माहिती मिळत आहे.
हे पण वाचा: मराठा आरक्षण मूक आंदोलन : “सर्वांचा पाठिंबा आणि कुणाचाही विरोध नाही, तर हा पेच सुटत का नाही?”
हे पण वाचा: नक्षलवाद्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा, छत्रपती संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया
डॉ. सुनिल देशमुख अमरावती महापालिकेच्या राजकारणात सक्रीय होते. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून थेट मुंबई गाठली. त्यांनी राज्याचे अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री म्हणूनही सत्ता उपभोगली. त्यांची कारकीर्द चांगली सुरू होती. मात्र, २००९ मध्ये देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना काँग्रेसने त्यांना डावलून रावसाहेब शेखावत यांना अमरावती विधानसभा मतदारसंगाची उमेदवारी दिली. यावेळी त्यांनी बंडखोरपणा करत अपक्ष निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला, तर रावसाहेब शेखावत आमदार झाले. याच नाराजीमधून त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याचे बोलले जाते.
हे पण वाचा: “लपत छपत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा.”
हे पण वाचा: “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी डॉ. देशमुखांचा पराभव केला आणि आज अखेर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये घरवापसी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तरीही देशमुख यांनी घरवापसी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फक्त देशमुखच नाहीतर आणखी पाच आमदार देखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.