मुंबई : मागील काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच गाजत आहेत. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेळगावात जाण्याचा सुचक इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आज शरद पवार यांनी जीवे ठार मारण्याचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद घेऊन आयत्या बिळावर नागोबाची भूमिका घेतली”; भाजपचा घणाघात
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर शरद पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली होती. तसेच वाद मिटत नसेल तर मी स्वत: बेळगावात जाणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यावरून आज शरद पवार यांचं मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
“प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणा”; अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
अलिकडेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. त्यांनीही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आपली मोठी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र वाद आता चांगलाचं पेटला आहे. त्यामुळे आगामी काही काळात यावरून राजकीय वातावरण देखील चांगलचं चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज सर्वपक्षीयांकडून मुक मोर्चाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. या मोर्चात भाजपचे खासदार उदयन राजे यांनी देखील या मोर्चात सहभाग नोंदवला आहे.
Read also
- पुण्यातल्या मोर्चात उदयन राजे सहभागी…! तर मनसे-भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ
- पुण्यात लॉकडाऊन सारखी पुन्हा परिस्थिती..! राजकीय पक्षांकडून पुणे बंदची हाक
- शाई फेकणाऱ्यावर जीवे मारण्याचा गुन्हा… राज ठाकरेंनी घेतली ही भूमिका
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद…! वाद चिघळत असतांनाही रोहित पवारांनी गाठलं थेट बेळगाव
- “चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर, तर बारामतीतून 51 हजारांचे बक्षीस”