पुणे : राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. स्व. यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतु एखाद्या नेत्याची दूरदृष्टी असल्यानंतर याच परिसरात चव्हाण साहेबांच्या नावाने चांगले प्रतिष्ठान व वास्तू उभी करण्याची कल्पना कोणाच्याही मनात आली नाही. काहींच्या मनात आली त्यासाठी जागा घेतल्या पण तिथे इमारत बांधण्यात आली नाही. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्णत्वाला न्यायचे व पुढची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्यासंदर्भातील आखणी करायची हे पवार साहेबांचे आजपर्यंतच्या कामातील गमक आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या अभीष्टचिंतन सोहळ्यामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
“दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही”; पुनम महाजनांची राहुल गांधींवर टिका
आपण सर्व महामानवांची नाव घेत असतो त्या सर्व महामानवांचे विचार व कार्य खऱ्याअर्थाने पुढे नेण्याचे काम जर मागील पन्नास वर्षात कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केले. देशाच्या राजकारणात सुस्कृंतपणा जपण्याचे काम हे देखील पवार साहेबांनी केले. परंतु राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये आर्थिक विकासाची भूमिका ही पवार साहेबांनी बजावली. अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांबद्दल भान हरपून बेताल वक्तव्य केली जातात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्य जन्मापासून महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या त्या भाागातील लोकसभेचे प्रतिनिधीत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार करत आहेत हा योगायोग म्हणावा लागेल. असंही ते म्हणाले.
“मोदीही बोलतात की, मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं”; अजित पवार
आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नेत्याने आपल्या जिल्ह्यातून स्वतःला आमदार करताना काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. आपण राज्यात पहिल्या क्रमांकावर जाऊ. तसेच प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही मतभेद आहेत ते सर्व संपवून टाकायचे. पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर नेहमीच बेरजेचे राजकारण केले आहे. हे करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर न्यायचा म्हटलं तर कुठेतरी काहीतरी पुढेमागे करावे लागेल याची खूणगाठ करून घ्यावी. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनुभवी, सर्वसमावेशक, सर्वामान्य, दूरदृष्टीने नेतृत्व म्हणून पवार साहेबांची ओळख आहे. काळवेळ कोणासाठी थांबत नसते यामध्ये आपल्याला बरेच काही करायचे असेल. असंही ते म्हणाले.
Read also
- “शाई फेक प्रकरणातील सर्व गुन्हे मागे घ्या, अन् हा वाद थांबवावा”; चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मागितली माफी
- पाटलांचं तोंड काळं केलं तर डोक्याला काळी पट्टी बांधली, मग महापुरूषांचा अवमान केला तेव्हा कुठे होता? राष्ट्रवादीचा सवाल
- “महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”; शिवसेना आक्रमक
- “शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा क्षेत्राचे विद्यापीठ”
- “राज्यपालांचं ते पत्र कधीचं? मग ते आत्ताच कसं समोर आलं?” अमोल कोल्हेंचा सवाल