नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, साहित्य, शेती या विषयांचे चालत बोलतं विद्यापीठ आहे. अशी भावना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त स्व.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जयशंकर फेस्टिवल लॉन्स बँक्वेट हॉल, औरंगाबाद रोड पंचवटी नाशिक येथे पार पडले. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.
“माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही”; नितेश राणेंंची गावकऱ्यांना धमकी
शरद पवार साहेबांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा कुटुंबियांकडून मिळालेला वारसा कायम जपला आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशावर नाही तर जगावर उपकार आहे. त्यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान केला.देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखा महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शेती क्षेत्रात त्यांच्यामाध्यमातून क्रांती झाली त्यामुळे आज जगाला शेती उत्पादने निर्यात करणारा भारत हा महत्वपूर्ण देश बनला आहे हे पवार साहेबांचे योगदान आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितले.
“शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात महिला आयोगाची स्थापना केली. महिलांना आपले हक्क मिळवून दिले. महिलांना सर्व क्षेत्रात समान आरक्षण मिळवून दिलं. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण उपलब्ध करून दिले. पवार साहेबांनी केवळ देशात नाही तर जगभरात महत्वाची मानस जोडली आहे. त्यांना देशात संविधानावर काम करणार, राज्यघटनेला अभिप्रेत लोकशाहीवर चालणारे, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे सरकार दिल्लीत आणि राज्यात अभिप्रेत आहे. त्यासाठी तुमचे आमचे कर्तव्य आहे त्यांना अभिप्रेत असलेले शासन देशात आणण्या कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले.
“१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”
मंत्रालयात सर्व महापुरुषांच्या सोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर लावण्यात आली. त्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यावेळी आभार देखील मानले. परंतू त्यांच्याच मंत्रिमंडळात काम करणारे काही मंत्री महापुरुषांच्या विरोधात चुकीची टिपणी करत आहे हे योग्य नाही या वाचाळ वीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आवरले पाहिजे आणि त्यांना कडक समज दिली पाहिजे अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली.
Read also
- “राज्यपालांचं ते पत्र कधीचं? मग ते आत्ताच कसं समोर आलं?” अमोल कोल्हेंचा सवाल
- “दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही”; पुनम महाजनांची राहुल गांधींवर टिका
- “मोदीही बोलतात की, मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं”; अजित पवार
- “नितेश राणेंच्या धमकीला भीक घालू नका”; गावकऱ्यांना धमकी देणाऱ्या राणेंना शिवसेनेने सुनावलं
- खडसेंच्या काळात नोकर भरतीत मोठा घोटाळा…! गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप