नाशिक : महापुरूषांचा अवमान केल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर काल शाईफेक करण्यात आली. त्यानंतर शाईफेक करण्यात आलेल्या व्यक्तीवर 307 कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून शाई फेकून कोण मरतं का? असा खोचक सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं.
महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात जो जो उभा राहील तो आपला आहे आणि त्यांच्या पाठीमागे उभे रहा. या फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात वारंवार महापुरुषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून वारंवार महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम यांचे चालू आहे. असंही भुजबळ म्हणाले.
कर्तव्यदक्ष अधिकारी नेत्यांना का खुपतंय…? तुकाराम मुंढेंच्या बदली मागे तानाजी सावंतंचा हात?
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांनी भीक मागितली असे विधान केले मात्र त्यांना ठाऊक नसेल १८६९ साली टाटा उद्योग समूहाचा वार्षिक उलाढालीचा आकडा हा २० हजार होता. तर पूना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टींग या कंपनीचा वार्षिक उलाढालीचा आकडा होता २१ हजार रुपये आणि या कंपनीचे सर्वेसर्वा होते महात्मा ज्योतिबा फुले.महात्मा फुले स्वत: उद्योगपती होते मोठमोठी कामे ते करत असत. आणि त्यातून मिळालेल्या पैश्याने त्यांनी समाजसुधारणेचे काम केले. लोकमान्य टिळकांना एका खटल्यातून सोडवण्यासाठी रूपये १०,००० इतकी रक्कम महात्मा फुले यांनी दिली होती. असं म्हणत छगन भुजबळांनी चंद्रकांत पाटलांवर टिका केली.
शिंदें-फडणवीसांची जादू, एकनाथ खडसे म्हणाले, “खोक्यांची ताकद लागली म्हणून…”
दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, माझ्या डोळ्याला कॅंन्सर झाला होता. स्कीरा रेटीनाचा प्रॉब्लेम आहे. हा हल्ला माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न होता का?त्याच डोळ्यावर शाई कशी फेकली. त्यांना माहिती होतं का ? माझ्या डॉक्टरांना मला फोन केला आणि सांगितलं आताच्या आता या. मी कार्यक्रम करून रात्री 12 ला गेलो तेव्हा त्यांनी डोळा साफ केला. हा भ्याड हल्ला आहे. असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटले होते.
Read also
- “१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर
- नरेंद्र मोदी, बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? उद्धव ठाकरेंचा टोला
- राज्यपालांचं अमित शहांना पत्र….! “महापुरूषांचा अवमानाची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”
- “खोटं कलम लावून त्याला आयुष्यात उठवण्याचा कुणाचा डाव असेल तर..” शाईफेक प्रकरणावरून रूपाली पाटलांचा इशारा