मुंबई : महाराष्ट्राची अवहेलना सातत्याने सुरू आहे. आपण शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपतींचा महाराष्ट्र असं म्हणतो, पण त्यांचाच अपमान करणारा माणुस, राज्यपालपदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आजही पंतप्रधानांसमवेत व्यासपीठावर असेल तर महाराष्ट्रानं समजायचं काय? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत राज्यपालांवर जहरी टिका केली.
“बावनकुळेंच्या नावाचा साधा नामोख्खेल ही मोदींकडून न होणे ही बाब काही मनाला पडली नाही”
महाराष्ट्राच्या बाजून कुणीच बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत आणि माज असल्यासारखे बोलत आहेत. पण आमचे मुख्यमंत्री त्यांना लिहून दिलेली तेवढीच स्क्रिप्ट वाचतात. अशी टिका देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. केंंद्रात, कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकार भाजपचेच मिंधे आहेत. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेतेही एकच आहेत. नरेंद्र मोदी..! मग बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
50 खोक्यांचा आरोप मावळला…! ठाकरे गटातील नेत्यांकडून बंडखोर आमदाराचं कौतुक
यातच छत्रपतींचा अवमान केल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्ष राज्यापालांच्या विरोधात आंदोलने करीत आहेत. यातच राज्यपालांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे आपली बाजू मांडली आहे. त्यांनी अमित शहा यांना 6 डिसेंबर रोजी पत्र लिहिलं होतं. ते पत्र आज समोर आलं आहे. त्यामुळे या मध्यल्या काळात ते पत्र समोर का आलं नाही? असा प्रश्न देखील सर्वसामान्यांना पडला आहे.
Read also
- राज्यपालांचं अमित शहांना पत्र….! “महापुरूषांचा अवमानाची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”
- “खोटं कलम लावून त्याला आयुष्यात उठवण्याचा कुणाचा डाव असेल तर..” शाईफेक प्रकरणावरून रूपाली पाटलांचा इशारा
- चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण…! पोलीस निलंबित, पत्रकारांना अटक, अन् वाचाळवीर नेत्यांची जीभ मात्र मोकाट
- कर्तव्यदक्ष अधिकारी नेत्यांना का खुपतंय…? तुकाराम मुंढेंच्या बदली मागे तानाजी सावंतंचा हात?
- शिंदें-फडणवीसांची जादू, एकनाथ खडसे म्हणाले, “खोक्यांची ताकद लागली म्हणून…”