मुंबई : राज्यपालांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी 6 तारखेला पत्र लिहिलं होतं. मग ते आताच कसं समोर आलं आहे? जर राज्यपाल यांनी पत्रात लिहिलंय की त्यांच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. तर वारंवार तशी वक्तव्य का येतात? असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
“शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
महापुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातील राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमित शहा यांना पत्र लिहून आपली भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यात त्यांनी या सर्व परिस्थितीचा वर्णन केलं आहे.
“१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”
महापुरूषांच्या अवमानाची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. मात्र या व्यक्तींच्या कामाचा आदर करणं म्हणजे महापुरूषांचा अनादर नव्हे. अस म्हणत त्यांनी महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श म्हणून उदाहरण दिलं आहे. त्यावरून त्यांच्यावर कडाडून टिका केली जात आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर
अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. चंद्र-सुर्य आकाशात आहेत. तोपर्यंत त्यांचं तेच स्थान असेल. त्यामुळे शिवरायांविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्य का होतायत, याचंही उत्तर मिळणं अपेक्षित आहे. अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. तसेच संसेदच्या हिवाळी अधिवेशनात मी यासंदर्भात मागणी केली. महापुरूषांचा अवमान होऊ नये. यासाठी कायदा म्हणून मी संवैधानिक मागणी करत होतो. त्यावेळी माझा माईक बंद झाला. त्यामुळे नेमकं सरकारच्या मनात काय सुरू आहे. असा संशय निर्माण होत असल्याची खंत देखील अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.
Read also
- “दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही”; पुनम महाजनांची राहुल गांधींवर टिका
- “मोदीही बोलतात की, मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं”; अजित पवार
- “नितेश राणेंच्या धमकीला भीक घालू नका”; गावकऱ्यांना धमकी देणाऱ्या राणेंना शिवसेनेने सुनावलं
- खडसेंच्या काळात नोकर भरतीत मोठा घोटाळा…! गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप
- “माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही”; नितेश राणेंंची गावकऱ्यांना धमकी