सिंधुदुर्ग : माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर विकास कामांना निधी देणार नाही. अशी धमकी भाजप नेते नितेश राणे यांनी दिली आहे. निधी वाटप आता माझ्या हातात आहे. त्यामुळे व्यवस्थित विचार करा. असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली असून विरोधकांनी नितेश राणे यांच्यावर टिका केली आहे. नांदगाव येथील एका सभेत नितेश राणे बोलत होते.
येथून पुढे जर माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर एकही रूपयाचा निधी देणार नाही. आता याला तुम्ही धमकी समजा, किंवा अन्य काही. पण निधी वाटप करण्याचा निर्णय माझ्या हातात आहे. हे लक्षात ठेवा. मंत्री असो, पालकमंत्री असो, आमदार असो, किंवा अन्य कोणी हे मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये कोणताही निधी देणार नाही. असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
राज्यात साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी आता राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी नेत्यांना का खुपतंय…? तुकाराम मुंढेंच्या बदली मागे तानाजी सावंतंचा हात?
दरम्यान, अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी बाजी मारल्याचा दावा करण्यात आला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील आम्हीच जास्त ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवल्याचा दावा ठोकला होता. त्यातच आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे.
Read also
- “शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
- “१२० धाडी, ६ वर्षाच्या नातीची चौकशी, अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण…;”
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीला मोठं गिप्ट..! अनिल देशमुखांना जामीन मंजुर
- नरेंद्र मोदी, बोम्मई एवढे जोरात बोलतात, तर आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? उद्धव ठाकरेंचा टोला
- राज्यपालांचं अमित शहांना पत्र….! “महापुरूषांचा अवमानाची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”