औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यपालांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भात पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 6 डिसेंबर रोजीच लिहिलं होतं. त्यावरून आता शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांना खोचक टोला हाणला आहे.
खडसेंच्या काळात नोकर भरतीत मोठा घोटाळा…! गिरीश महाजनांचा खडसेंवर गंभीर आरोप
राज्यपाल महोदयांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून भूमिका विषद केली म्हणे. आपल्या वाचाळपणाचे स्पष्टीकरण दिल्ली दरबारी देऊन आपले बोलवते धनी कोण, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार असल्याचंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
“माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही”; नितेश राणेंंची गावकऱ्यांना धमकी
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, माफीवर हा विषय आता थांबणार नाही. या राज्यपालांची हकालपट्टीच व्हायलाच हवी. दिल्लीला केलेले पत्रलेखन ही उरलेली अब्रु वाचवण्याची धडपड आहे. महाराष्ट्राचे मीठ खाऊन येथील मातीला दुषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे केंद्र आणि राज्यपालांनी ध्यानी ठेवावे. असंही ते म्हणाले.
“शाई फेकून कोण मरतं का?” छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमित शहा यांना 6 डिसेंबर रोजी पत्र पाठवलं होतं. वर्तमानातील कर्तव्यशील माणसांचं आदर्श सांगणं म्हणजे महापुरूषांचा अपमान नव्हे. असं देखील त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी जुने आदर्श म्हणून संबोधलं होतं, तर नितीन गडकरी, शरद पवार यांना सध्याच्या काळाती आदर्श म्हणून उल्लेख केला होता. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. तर अनेकांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून द्या. अशी मागणी देखील केली आहे. अन् त्याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी अमित शहा यांना पत्राद्वारे आपली बाजू मांडली आहे.
Read also
- “शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा क्षेत्राचे विद्यापीठ”
- “राज्यपालांचं ते पत्र कधीचं? मग ते आत्ताच कसं समोर आलं?” अमोल कोल्हेंचा सवाल
- “दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही”; पुनम महाजनांची राहुल गांधींवर टिका
- “मोदीही बोलतात की, मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं”; अजित पवार
- “नितेश राणेंच्या धमकीला भीक घालू नका”; गावकऱ्यांना धमकी देणाऱ्या राणेंना शिवसेनेने सुनावलं