मुंबई : उद्धव ठाकरे यांनी हम दो ची भूमिका घेत स्वत: मुख्यमंत्री झाले व मुलाला मंत्रिपद दिले. ठाकरे यांनी निवडणुकीत विजयी न होता मुख्यमंत्री पद घेऊन आयत्या बिळावर नागोबाची भूमिका घेतली. अशी जहरी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
“राज्यपालांचं ते पत्र कधीचं? मग ते आत्ताच कसं समोर आलं?” अमोल कोल्हेंचा सवाल
पुढे बोलताना ते असं म्हणाले की, भाजपवर बेईमानीचे आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना सर्व आमदार व खासदारांची राजीनामे घेऊन निवडणुकीला सामाेरे जायला हवे होते. भाजपशिवाय त्यांचे किती उमेदवार निवडून आले हे त्यानंतर कळाले असते. आम्हाला बेईमान म्हणणारे उद्धव ठाकरेेच बेईमान आहेत. अशी टिकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
“दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही”; पुनम महाजनांची राहुल गांधींवर टिका
काल पत्रकार परिषेद घेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा प्रखर शब्दात टिका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“मोदीही बोलतात की, मला पवार साहेबांनी राजकारण शिकवलं”; अजित पवार
दरम्यान, महाराष्ट्राची अवहेलना सातत्याने सुरू आहे. आपण शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपतींचा महाराष्ट्र असं म्हणतो, पण त्यांचाच अपमान करणारा माणुस, राज्यपालपदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आजही पंतप्रधानांसमवेत व्यासपीठावर असेल तर महाराष्ट्रानं समजायचं काय? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत राज्यपालांवर जहरी टिका केली.
Read also
- “प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणा”; अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
- “शाई फेक प्रकरणातील सर्व गुन्हे मागे घ्या, अन् हा वाद थांबवावा”; चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मागितली माफी
- पाटलांचं तोंड काळं केलं तर डोक्याला काळी पट्टी बांधली, मग महापुरूषांचा अवमान केला तेव्हा कुठे होता? राष्ट्रवादीचा सवाल
- “महाराष्ट्राच्या मातीला दुषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”; शिवसेना आक्रमक
- “शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा क्षेत्राचे विद्यापीठ”