लातूर : लातूर जिल्हा बँकेत 19 संचालकांच्या पदासाठी ही निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. काँग्रेस प्रणित पॅनलच्या दबावाखाली हे अर्ज बाद करण्यात आले आहेत, असा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजपने थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना लसीचे १०० कोटी डोस खरोखरच दिले गेलेत का? संजय राऊतांचा सवाल
लातूर जिल्हा बँकेत 19 संचालकांच्या पदासाठी ही निवडणूक होते आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज काही ना काही त्रुटी काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले आहेत. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अर्ज बाद करण्याचं राजकारण केलं गेलं. या विरोधात आम्ही राज्यपालांकडे तक्रार करू असं भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी सांगितले आहे .
संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसेल; चित्रा वाघ भडकल्या
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांचे सर्वच अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. काँग्रेस प्रणित सहकार पॅनेलच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी भाजपाचे अर्ज बाद केले असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. तर दुसरीकडे सहकार पॅनलचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार धीरज देशमुख हे बिनविरोध निवडून आल्यानंतर समर्थकांनी अनेक ठिकाणी जल्लोष केला. दरम्यान, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, उर्वरित 15 जागांसाठी काँग्रेसचेच 31 अर्ज शिल्लक राहिले आहेत . अर्ज मागे घेण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी आहे. 19 संचालक निवडून देण्यासाठीची निवडणूक लागली आहे.
Read Also :
- ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है; नांदेडमधील सभेत छगन भुजबळांचा शायराणा अंदाज
- मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा – राधाकृष्ण विखे पाटील
- आम्हाला अडकवण्यासाठी भाजपची ८ महिन्यांपुर्वी बैठक झाली होती; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
- शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार; राजू शेट्टींचा इशारा
- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ