नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही देगलूरमध्ये ठाण मांडून आहेत. छगन भुजबळ यांनीही देगलूरमध्ये जाऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेरोशायरीची पखरण करत आपल्या खास शैलीत भाजपवर हल्ला चढवला. ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है आज तेरा है कल मेरा होगा… अश्या शायराना अंदाजात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तोफ धडाडली.
संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसेल; चित्रा वाघ भडकल्या
कितीही कारवाया केल्या तरी मी बदलणार नाही, असंही सांगत भुजबळांनी ईडीच्या कारवायांबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले, ही सभा मला मोठ्या दुःखद अंतकरणाने घ्यावी लागत आहे. कै.रावसाहेब अंतापुरकर यांनी कोरोना काळात सर्व सामान्यांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाकाळात देखील त्यांचे जनसेवेचे काम चालू होते अश्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता जी निवडणूक होणार आहे त्यात रावसाहेबांचा मुलगा जितेश रावसाहेब अंतापुरकर हा महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. जितेश हा उच्च शिक्षित आहे. आपले शिक्षण पूर्ण करून तो स्वतःच्या पायावर उभा होता. मात्र दुर्दैवाने रावसाहेबांचा मृत्यू झाला आणि जितेशला निवडणुकीत भाग घ्यावा लागला आता आपली जबाबदारी आहे त्याला विजय केले पाहिजे. असं आवाहन त्यांनी केलं.
कोरोना लसीचे १०० कोटी डोस खरोखरच दिले गेलेत का? संजय राऊतांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी योग्य पद्धतीने काम करत आहे. कोरोना काळात भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे त्या उत्तर प्रदेश, आणि बिहार राज्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. त्याच्या कित्येक पटीने चांगले काम महाराष्ट्र राज्याने केले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा – राधाकृष्ण विखे पाटील
- आम्हाला अडकवण्यासाठी भाजपची ८ महिन्यांपुर्वी बैठक झाली होती; रोहित पवारांचा खळबळजनक दावा
- शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार; राजू शेट्टींचा इशारा
- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ
- मुंबई पोलिसांनी २७ कोटींचे हेरॉईन पकडले, पण त्यात हेरॉईनच नव्हती म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही