सोलापूर : सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच जिल्ह्याध्यक्षांनी बुधवारी सांयकाळी मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागात काॅंग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष नेमावे अशी मागणी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली होती. यावरून ग्रामीण भागातील डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी व तालुकाध्यकांनी तीव्र विरोध केला होता.
हेही वाचा…नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, शिंदे गटाला मोठा धक्का बसणार ?
पत्रकार परिषद घेऊन ग्रामीण भागातील तालुकाध्यक्षकांनी शहर अध्यक्षकांवर नाराजी व्यक्त केली होती. दोन जिल्ह्याध्यक्ष पदावरून शहर अध्यक्ष व जिल्हाअध्यक्ष असे दोन गट पडले आहेत. सोलापूर काॅंग्रसेमध्ये दोन जिल्ह्याध्यक्ष पदावरून फुट पडते की काय असे चित्र निर्माण झाले आहे . ग्रामीण भागातील काॅंग्रेस नेत्यांनी थेट सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन शहर अध्यक्षकांना ताकीद द्यावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यावरून आता जागा वाटपावरून कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक वाद होतांना दिसत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत चित्र नेमकं कसं असणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…ललित पाटीलसाठी रूग्णालयात महिला कोण पाठवायचा ? धंगेकरांनी आणखी एक बॉ’म्ब टाकला
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?