मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. शिवसेना प्रकरण ७ न्यायामूर्तींच्या बेंचकडे सोपवले जावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्यावर आता उद्यापासून कोर्टात सुनावणी होणार असून सुनावणी कधी होणार, त्यांची रूपरेषा उद्या कळणार आहे. त्यामुळे आता या घटनेकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
हेही वाचा…“तेव्हा महाराष्ट्रात दोनच नेत्यांनी काॅंग्रेसच्या विरोधात रान पेटवलं होतं”, सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
शिवसेना प्रकरणाबाबत अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. केवळ एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटीशीने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत याचा फैसला कोर्टात होणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याचा राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा असणार आहे.
हेही वाचा…“धंगेकरांचा पारा चढला..! अन् थेट ससून रूग्णालय गाठून ‘या’ प्रकरणाबाबत ससून रूग्णालय प्रशासनाला धरले धारेवर
दरम्यान, शिवसेनेच्या संदर्भात कोर्टात एकूण पाच याचिका दाखल असून त्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. त्यानंतर आता उर्वरित याचिकांबाबत सात न्यायमूर्तीच्या घटनापीठांकडे निर्णय सोपावावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावर आता उद्यापासून कोर्टात सुनावणी होणार आहे. यातच आता राष्ट्रवादीचंही प्रकरण आल्यानंतर या निर्णयांकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,..
हेही वाचा…पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांनी दिला राजीनामा ? नेमकं काय घडलं?
हेही वाचा…“आम्ही ठरवले असते तर शिवतीर्थावर सभा घेतलीही असती, पण..,”दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी घेतली माघार
हेही वाचा…आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवस आधीच होणार, मोठं कारण आलं समोर