मुंबई : भारतातील नेते मंडळी, पत्रकार आणि अन्य काही महत्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप मोदी सरकारवर होत आहे. इस्रायलकडून पेगॅसस नावाच्या सॉफ्टवेअरर्फत हा डेटा सरकारने स्वत:कडे घेतला आणि संबंधित लोकांचे फोन कॉल्स आणि संभाषणं टॅप करण्यात आल्याची बातमी न्यूयॉर्क टाईम्सने दिली होती. यानंतर भारतातही वातावरण पेटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही रेकी करण्यात आल्याची टीका होतीय.
भारताला आत्मनिर्भर अन् बलशाली बनविणारा अर्थसंकल्प – आमदार महेश लांडगे
त्यामुळे आज मुंबईत आमदार झिशान सिद्धिकी यांनी आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र दादर रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी समोर येत घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण आणखी तापलं.
२०२२चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यावेळी भाजपच्या बाजूने आमदार प्रसाद लाड आणि शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिली. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवनेकांनी ठिय्या दिल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. दतर, दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांनीही राडा केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपत भाजप सरकारचा निषेध नोंदवला.
Read also:
- समीर वानखेडेंना महाविकास आघाडी सरकारचा दणका; बारचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
- गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा; रोहन खंवटे यांचे आवाहन
- नितेश राणेंच्या पाठोपाठ आता निलेश राणेंवरही गुन्हा दाखल; राणेंच्या दोन्ही पुत्रांभोवती पोलिस कारवाईचा फास
- इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण खपवून घेणार नाही; अंकिता पाटलांचा दत्तात्रय भरणेंना इशारा
- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजप प्रवेश थांबवा आणि मग स्वप्न बघा; मुळीक यांचे जगतापांना खुले आव्हान